असच काहीतरी सुचलेल.

आज काही करताना भविष्याचा विचार करावा
कारण आजची चुक भविष्याला जायबंदी करते.
येणारा प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो
पण गमावलेली संधी मात्र कधीतरी काही दरवाजे कायमचे बंद करते.

विसर पडण्याचं वरदान हे तुम्हाआम्हाला आहे
काही कटू क्षण म्हणूनच आज आठवत नाही.
पण एखादी सुकलेली जखम मनातली
वेदनेपेक्षा कमी त्रास देत नाही.

कोमेजल्या फुलाला पाहून मन विचारात पडलं
देवाचे पायी पडलं म्हणून कोमेजलं तरी निर्माल्य ठरलं.
माणसांच्या बाबतीत मात्र असं काही होत नाही...
भरारी मारताना कोसळलेला कोणी प्रयत्नांच्या पायी पडलेला निर्माल्य का ठरू नये.

किशोर...

Comments

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....