QWERTY किपॅडची कविता...
धरून आहे का हे तर्कशुद्ध नियमानुसार माहीत नाही, पण मलातरी वाटत... असेल तरी ते जास्त महत्वाचे नाही. तु फक्त लिहीत राहा, आणि मग त्या शब्दांना कुणीतरी दाद दिली.. तर खांद्यावर घेऊन मनसोक्त नाचत रहा त्या कौतुकाला. फार सुंदर आहे कविता तुझी म्हणालच कुणी, डोळ्यात पाणी आलच कुणाच्या, तर ते पाणी बंद करून घे मुठीत.. घरी आल्यावर त्याला सोडून दे तुझ्या जवळ रडणार्या आठवणी जवळ. हसर्या काही ओळी उतरल्या कागदावर, तर दचकून जागा नको होउस. अवचित आलेला पाऊस असेल तो, आला तसा निघून जाईल. संपर्क साधावा असे आवाहन करण्याच्या फंदात मात्र पडु नकोस, असा पाउस घेऊन येणारे ढग जमा झाले तरी बरसतीलच ह्याचा काही भरवसा नाही. किशोर...